जिल्ह्यात कोरोनाचे ९७२ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ९७२ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात २ हजार ४३० अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ६२० जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३३६ नवे रूग्ण मिळाले तर ० मृत्यू, सध्या ६१७ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार १०९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ११७ नवे रूग्ण, २ मृत्यू तर ३५४ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार ८५३ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २६५ नवे रूग्ण १ मृत्यू तर ९३६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १ हजार ९७० जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १४२ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या २५९ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३८० जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज २७ रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ६३ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६४८ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ६ रूग्ण, ० मृत्यू, सध्या २४ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १८ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ३८ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५६३ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १८ रूग्ण, ० मृत्यू तर २४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३८० जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये ४३ नवे रूग्ण १ मृत्यू तर ११५ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २४० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading