जिल्ह्यात कोरोनाचे ८४९ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ८४९ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात ४ हजार ९२९ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ८९८ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ३४२ रूग्ण आढळले. सध्या १ हजार ९४६ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १३१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ८७ रूग्ण, सध्या ५०१ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९५४ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ३१३ नवे रूग्ण तर १ हजार ६८१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ४९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ६७ रूग्ण तर सध्या ४१८ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३९९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ७ रूग्ण तर सध्या ७९ रूग्ण उपचारार्थ दाखल आहे. आत्तापर्यंत ६५६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज २ रूग्ण, सध्या २३ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ० रूग्ण, ० रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत ५८० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ७ रूग्ण तर ५६ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २४ रूग्ण, सध्या २२५ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading