जिल्ह्यात कोरोनाचे ६२८ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १६ हजार ३२ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ७८५ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १७४ नवे रूग्ण आढळले. तर एकही मृत्यू नाही. सध्या ४ हजार ८६८ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार ११७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ६० नवे रूग्ण तर २ जणांचा मृत्यू झाला. सध्या ३ हजार ७६९ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९२३ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २८० नवे रूग्ण ३ मृत्यू तर ४ हजार ९८२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार १८ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ४० नवे रूग्ण, १ मृत्यू, सध्या ५३२ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३९४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ४ रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ४८४ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६५३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ४ रूग्ण, ० मृत्यू, सध्या ८७ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७९ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १५ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या २६२ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५७२ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १० रूग्ण, १ मृत्यू तर १९८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३८२ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये ४१ नवे रूग्ण मिळाले तर ० मृत्यू, सध्या ८५० रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २४८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.