जिल्ह्यात कोरोनाचे ६०९ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात ५ हजार ६८१ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९०६ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १९६ रूग्ण आढळले. सध्या २ हजार २६६ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १३५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ८९ रूग्ण, सध्या ६८० रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९५४ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २०० नवे रूग्ण आढळले. सध्या १ हजार ६०१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५१ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ५४ रूग्ण तर सध्या ४५० अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३९९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ११ रूग्ण तर सध्या १०८ रूग्ण उपचारार्थ दाखल आहे. आत्तापर्यंत ६५७ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १ रूग्ण, सध्या ४४ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ० रूग्ण, ० रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत ५८० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ११ रूग्ण तर ५७ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये ४७ रूग्ण, सध्या २८४ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.