जिल्ह्यात कोरोनाचे २७३ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात ८१० अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १११ रूग्ण आढळले. सध्या ३३४ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये २९ रूग्ण, सध्या ५५ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९५४ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ९७ नवे रूग्ण तर २६७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ४९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज २० रूग्ण, सध्या १०३ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३९८ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ३ रूग्ण तर सध्या ६ रूग्ण उपचारार्थ दाखल आहे. आत्तापर्यंत ६५५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १ रूग्ण, सध्या ३ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ० रूग्ण, ० रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत ५८० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ० रूग्ण तर ७ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १२ रूग्ण, सध्या ३५ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.