जिल्ह्यात कोरोनाचे २४१ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे २४१ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १ हजार ४७७ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ६१५ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ७४ नवे रूग्ण मिळाले तर ० मृत्यू, सध्या ४१९ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार १०९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये २८ नवे रूग्ण, १ मृत्यू तर २४५ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार ८५१ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ८३ नवे रूग्ण ० मृत्यू तर ५३२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १ हजार ९६९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ३२ नवे रूग्ण, १ मृत्यू, सध्या ९८ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३७९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १ रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ४३ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६४८ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १ रूग्ण, ० मृत्यू, सध्या १५ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ४ नवे रूग्ण, १ मृत्यू, सध्या २४४ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५६३ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ४ रूग्ण, २ मृत्यू तर २१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३८० जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये १४ नवे रूग्ण ० मृत्यू तर ८० रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २३९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading