जिल्ह्यात कोरोनाचे १५६ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात १ जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात २ हजार २८३ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ८४६ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ४१ नवे रूग्ण आढळले. तर एकही मृत्यू नाही. सध्या ८१० रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १२४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये २१ नवे रूग्ण तर १ मृत्यू, सध्या ३४० रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९३९ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ४० नवे रूग्ण ० मृत्यू तर ७३० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ३८ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १४ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ९९ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३९६ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १० रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ८३ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६५५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ६ रूग्ण, ० मृत्यू, सध्या २६ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७९ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ३ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ४५ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५७९ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ५ रूग्ण, ० मृत्यू तर २८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३८४ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये १६ नवे रूग्ण मिळाले तर एकही मृत्यू नाही. सध्या १२२ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २२२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.