जिल्ह्यात कोरोनाचे १०५ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १०५ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात १ जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १ हजार ६८ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ६०१ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३९ नवे रूग्ण मिळाले तर ० मृत्यू, सध्या ३१९ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार १०९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १२ नवे रूग्ण, ० मृत्यू तर १६९ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार ८४६ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ३६ नवे रूग्ण ० मृत्यू तर ३८३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १ हजार ९६९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ४ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ३८ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३७८ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ५ रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या २० रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६४८ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, ० मृत्यू, सध्या १२ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ० नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या १९ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५५७ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ३ रूग्ण, ० मृत्यू तर १३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३७८ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये ६ नवे रूग्ण १ मृत्यू तर ९५ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २३९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading