जिल्ह्यात आज कोरोनामुळे ६५ जणांचा मृत्यू

एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असताना आज जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे ६५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रामध्ये ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज कोरोनाचे ४९८ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १० हजार ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज १०९ नवे रूग्ण सापडले तर ४ जणांचा मृत्यू झाला तर आत्तापर्यंत १ हजार ९३३ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज १७२ नवे रूग्ण, ६ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार २४५ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ५६ नवे रूग्ण ४ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ६५० दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज ६६ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २९९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १० नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४७९ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज २ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ४४९ जणं दगावले. अंबरनाथमध्ये २० नवे रूग्ण, ४५ मृत्यू तर आत्तापर्यंत ४५६ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १० नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत २५४ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ५३ नवे रूग्ण सापडले तर ४ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत ९९१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading