जिल्ह्यात आज कोरोनाचे ८८७ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ८८७ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ८ हजार ७६८ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज १६९ नवे रूग्ण सापडले तर ९ जणांचा मृत्यू झाला तर आत्तापर्यंत १ हजार ७९० जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज २१५ नवे रूग्ण, २२ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ७९० जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १३९ नवे रूग्ण ९ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ५४४ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज १२७ नवे रूग्ण, ७ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २३१ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १७ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ४६४ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १२ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ४२८ जणं दगावले. अंबरनाथमध्ये २८ नवे रूग्ण, ३ मृत्यू तर आत्तापर्यंत ४०१ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ४४ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज १३६ नवे रूग्ण सापडले तर ९ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत ८३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading