जिल्ह्यात आज कोरोनाचे ५६८ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ५६८ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ९ हजार ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज १२५ नवे रूग्ण सापडले तर ४ जणांचा मृत्यू झाला तर आत्तापर्यंत १ हजार ९०८ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज १३६ नवे रूग्ण, २२ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ४७ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ८१ नवे रूग्ण ४ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ६१६ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज ७० नवे रूग्ण, ३ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २८१ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ३३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४७४ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ४ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ४४१ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १३ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत ४०९ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १७ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत २५४ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ८९ नवे रूग्ण सापडले तर ८ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत ९०२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading