जिल्ह्यात आज कोरोनाचे ५३४ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १० हजार ६९९ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज १०६ नवे रूग्ण सापडले तर ३ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार १० जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज १३३ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ५९२ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १४६ नवे रूग्ण ६ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ७५१ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ४८ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३३६ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १० नवे रूग्ण, ३ मृत्यू, तर आत्तापर्यंत ५०५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज २ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ४५९ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १२ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ५१७ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १८ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३४७ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ५९ नवे रूग्ण सापडले तर २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार १८३ जणांचा मृत्यू झाला आहे.