जिल्ह्यात आज कोरोनाचे ४७९ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १० हजार ८०३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज १०० नवे रूग्ण सापडले तर ४ मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ३४ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज १०३ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ६०८ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १०९ नवे रूग्ण २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ७७९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ७२ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३४२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १० नवे रूग्ण, २ मृत्यू, तर आत्तापर्यंत ५२२ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४६० जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १८ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ५१८ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज २० नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ३४८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ४२ नवे रूग्ण सापडले तर २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार १९२ जणांचा मृत्यू झाला आहे.