ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ४६१ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ हजार ७४८ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ७६५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख २१ हजार २७२ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख ३३ हजार ७८५ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ४४९ रूग्ण उपचार घेत असून ५० हजार १६८ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार २५७ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार ४१० रूग्ण उपचार घेत असून ५२ हजार ६०७ बरे झाले तर १ हजार ७३ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार ३२३ रूग्ण असून ४६ हजार ८६१ बरे झाले तर १ हजार २ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ४९७ रूग्ण उपचार घेत असून २३ हजार ३२३ कोरोनातून बरे झाले तर ७६३ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ४२६ रूग्ण असून १० हजार ३१५ बरे झाले तर ३५६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ७० रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ९१२ कोरोनातून बरे झाले तर ३४७ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १३४ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ५९१ बरे झाले तर २९२ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये २२७ रूग्ण असून ७ हजार ९९२ कोरोनामुक्त झाले तर ११० जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार २१२ रूग्ण असून १६ हजार ५६२ बरे झाले तर ५६५ जणांचा मृत्यू झाला आहे.