जिल्ह्यात आज कोरोनाचे ४५० नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ४५० नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ हजार ९२२ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ८४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख २६ हजार ५६५ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख ३७ हजार ३२९ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ९४७ रूग्ण उपचार घेत असून ५१ हजार ५५९ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार २७८ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार २३२ रूग्ण उपचार घेत असून ५३ हजार ७२३ बरे झाले तर १ हजार ८४ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार ४३ रूग्ण असून ४७ हजार ८०२ बरे झाले तर १ हजार २२ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ४४७ रूग्ण उपचार घेत असून २३ हजार ७२३ कोरोनातून बरे झाले तर ७७४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ४१३ रूग्ण असून १० हजार ४२७ बरे झाले तर ३५७ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ५५ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ९६९ कोरोनातून बरे झाले तर ३४९ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ११९ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ६९७ बरे झाले तर २९५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १८० रूग्ण असून ८ हजार २५५ कोरोनामुक्त झाले तर ११० जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये ४८६ रूग्ण असून १७ हजार ४६९ बरे झाले तर ५७४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading