जिल्ह्यात आज कोरोनाचे ४५४ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ४५४ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ९ हजार ५७० जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज १२० नवे रूग्ण सापडले तर ५ जणांचा मृत्यू झाला तर आत्तापर्यंत २ हजार १७९ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ११६ नवे रूग्ण, ५ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार १७९ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ५८ नवे रूग्ण ३ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ६४६ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज ७३ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २९८ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४७९ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ५ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत ४४८ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ११ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४११ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत २५४ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ५३ नवे रूग्ण सापडले तर ४ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत ९२६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading