ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ४१३ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ हजार १५१ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ६ हजार ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ३७ हजार ९७७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख ४८ हजार १७० पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ८ रूग्ण उपचार घेत असून ५४ हजार ७०३ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ३३६ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार ७७ रूग्ण उपचार घेत असून ५६ हजार ५८९ बरे झाले तर १ हजार ११८ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ८६८ रूग्ण असून ४९ हजार ९८२ बरे झाले तर १ हजार ७१ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ४४२ रूग्ण उपचार घेत असून २४ हजार ६४३ कोरोनातून बरे झाले तर ७९२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये १२९ रूग्ण असून १० हजार ९८५ बरे झाले तर ३६३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ४७ रूग्ण उपचार घेत असून ६ हजार २५६ कोरोनातून बरे झाले तर ३५२ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १३५ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ९८८ बरे झाले तर ३०७ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १५६ रूग्ण असून ८ हजार ८०६ कोरोनामुक्त झाले तर १२० जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २८९ रूग्ण असून १८ हजार ८२ बरे झाले तर ५८२ जणांचा मृत्यू झाला आहे.