ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ३९० नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ हजार ९२ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ९४६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ३२ हजार ७९७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख ४२ हजार ८३५ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ९८१ रूग्ण उपचार घेत असून ५३ हजार ८२ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ३०६ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार ९ रूग्ण उपचार घेत असून ५५ हजार २८९ बरे झाले तर ११०१ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ९१३ रूग्ण असून ४८ हजार ९७२ बरे झाले तर १ हजार ४९ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ३५५ रूग्ण उपचार घेत असून २४ हजार २५८ कोरोनातून बरे झाले तर ७८२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये २९३ रूग्ण असून १० हजार ६८५ बरे झाले तर ३५८ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ३५ रूग्ण उपचार घेत असून ६ हजार २१३ कोरोनातून बरे झाले तर ३५२ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १०२ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ८४२ बरे झाले तर ३०२ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १६४ रूग्ण असून ८ हजार ५७४ कोरोनामुक्त झाले तर ११५ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २४० रूग्ण असून १७ हजार ९४२ बरे झाले तर ५८० जणांचा मृत्यू झाला आहे.