ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ३४८ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ हजार ४५ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ९४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ३२ हजार ४६० रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख ४२ हजार ४४५ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ९८१ रूग्ण उपचार घेत असून ५२ हजार ९७६ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ३०४ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार रूग्ण उपचार घेत असून ५५ हजार १९८ बरे झाले तर ११०० जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ८९० रूग्ण असून ४८ हजार ९१३ बरे झाले तर १ हजार ४७ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ३४५ रूग्ण उपचार घेत असून २४ हजार २३० कोरोनातून बरे झाले तर ७८२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ३१५ रूग्ण असून १० हजार ६५६ बरे झाले तर ३५८ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ३३ रूग्ण उपचार घेत असून ६ हजार २१२ कोरोनातून बरे झाले तर ३५२ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ९८ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ८४२ बरे झाले तर ३०२ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १५८ रूग्ण असून ८ हजार ५५१ कोरोनामुक्त झाले तर ११५ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २२५ रूग्ण असून १७ हजार ९४१ बरे झाले तर ५८० जणांचा मृत्यू झाला आहे.