ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ३४३ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ हजार ५२ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ९५८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ३३ हजार १६८ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख ४३ हजार १७८ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ९८४ रूग्ण उपचार घेत असून ५३ हजार २१५ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ३०८ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार २५ रूग्ण उपचार घेत असून ५५ हजार ३५६ बरे झाले तर १ हजार १०२ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ८९१ रूग्ण असून ४९ हजार ६० बरे झाले तर १ हजार ५१ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ३५१ रूग्ण उपचार घेत असून २४ हजार २७९ कोरोनातून बरे झाले तर ७८३ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये २७० रूग्ण असून १० हजार ७१६ बरे झाले तर ३५८ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ३३ रूग्ण उपचार घेत असून ६ हजार २१९ कोरोनातून बरे झाले तर ३५२ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ९१ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ८५७ बरे झाले तर ३०२ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १६१ रूग्ण असून ८ हजार ५९० कोरोनामुक्त झाले तर ११५ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २४६ रूग्ण असून १७ हजार ९४२ बरे झाले तर ५८० जणांचा मृत्यू झाला आहे.