जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ५३९ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ५३९ नवे रूग्ण सापडले. जिल्ह्यात सद्यस्थितीत २२ हजार ८६८ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत २ हजार २८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५७ हजार ६३७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण ८२ हजार ७८९ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ४ हजार ८९१ रूग्ण उपचार घेत असून १२ हजार ९२९ कोरोना रूग्ण बरे झाले तर ६१७ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ५ हजार ७७७ रूग्ण उपचार घेत असून १३ हजार १९६ बरे झाले तर ३३६ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ४ हजार ४६६ रूग्ण असून ९ हजार ७५४ बरे झाले तर ४०७ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ८४५ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ८७२ कोरोनातून बरे झाले तर २६६ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये १ हजार ७१७ रूग्ण असून ४ हजार ८३२ बरे झाले तर १२४ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ५०० रूग्ण उपचार घेत असून २ हजार ८७३ कोरोनातून बरे झाले तर १९४ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ५४९ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून २ हजार ९९४ बरे झाले तर १४६ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ४९० रूग्ण असून १ हजार ९१३ कोरोनामुक्त झाले तर ४४ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २ हजार ६३३ रूग्ण असून ३ हजार २७४ बरे झाले तर १५० जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading