जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ४७२ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ४७२ नवे रूग्ण सापडले. जिल्ह्यात सद्यस्थितीत २३ हजार ६९० कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत २ हजार १५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५२ हजार ७२४ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण ७८ हजार ५६७ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ५ हजार ५५२ रूग्ण उपचार घेत असून ११ हजार ५८४ कोरोना रूग्ण बरे झाले तर ५९६ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ५ हजार ८२३ रूग्ण उपचार घेत असून १२ हजार ३६५ बरे झाले तर ३०७ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ४ हजार ४०० रूग्ण असून ८ हजार ८३० बरे झाले तर ३८८ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ७६२ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ५६० कोरोनातून बरे झाले तर २५४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये २ हजार रूग्ण असून ४ हजार ३३३ बरे झाले तर ११२ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ५१९ रूग्ण उपचार घेत असून २ हजार ७४८ कोरोनातून बरे झाले तर १८७ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ५५८ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून २ हजार ८१४ बरे झाले तर १३९ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ५६८ रूग्ण असून १ हजार ७०५ कोरोनामुक्त झाले तर ३५ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २ हजार ५०८ रूग्ण असून २ हजार ७८५ बरे झाले तर १३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading