जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २२१ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २२१ नवे रूग्ण सापडले असून आज दिवसभरात ३२ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२ हजार २२७ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ३ हजार ४५५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ४ हजार ४५० रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण १ लाख २० हजार १३२ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ७५५ रूग्ण उपचार घेत असून २२ हजार ६९९ कोरोना रूग्ण बरे झाले तर ८१९ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ३ हजार १८७ रूग्ण उपचार घेत असून २४ हजार १४० बरे झाले तर ६०१ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ४२१ रूग्ण असून २१ हजार १ बरे झाले तर ५७१ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ४२६ रूग्ण उपचार घेत असून १० हजार ३५५ कोरोनातून बरे झाले तर ४१८ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ३६२ रूग्ण असून ७ हजार १०४ बरे झाले तर २२२ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये १५५ रूग्ण उपचार घेत असून ३ हजार ७१४ कोरोनातून बरे झाले तर २८३ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ३०५ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ४ हजार ३७५ बरे झाले तर १८२ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये २१४ रूग्ण असून ३ हजार ७०६ कोरोनामुक्त झाले तर ६९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ४०२ रूग्ण असून ७ हजार ३५६ बरे झाले तर २९० जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading