जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवा रूग्ण आढळला नाही. सध्या जिल्ह्यात १२ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९६७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज एकही रूग्ण नाही. सध्या ३ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १६४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये एकही रूग्ण नाही. सध्या १ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९६२ रूग्ण दगावले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ० रूग्ण, सध्या २ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५७ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये एकही रूग्ण नाही. सध्या ३ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ४०७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ० रूग्ण, आत्तापर्यंत ६६६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, सध्या १ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ० रूग्ण, आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये ० रूग्ण, सध्या १ रूग्ण उपचार घेत आहे. आत्तापर्यंत १ हजार २५७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.