ठाणे आणि पालघरमधील सर्व न्यायालयांमध्ये ८ फेब्रुवारीला राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका, कौटुंबिक, कामगार, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, वैवाहिक, धनादेशासंबंधी, बँक वसुली प्रकरणं, मोटार अपघात, कौटुंबिक वाद, कामगारविषयक वाद, भूसंपादन, वीज आणि पाणी विषयक देयक, महसुल प्रकरणं तसंच दाखल पूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.