जिल्हा परिषदेला लोकाभिमुख बनविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया – पुष्पा पाटील

ग्रामीण भागात विविध लोकोपयोगी योजनांची यशस्वी अमंलबजावणी करून जिल्हा परिषदेला लोकाभिमुख बनविण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने ‘शिवस्वराज्य’ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाटील यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून अभिवादन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी शिवस्वराज्य दिनाबाबत माहिती दिली तसंच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी यावेळी महाराष्ट्र गीत आणि पोवाडे सादर केले. मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर आदी तालुक्यातील ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावरही शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading