जिल्हा परिषदेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ

दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना शपथ दिली. दरवर्षी २१ मे हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधत दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेतली जाते. यंदा शासनाने दिलेल्या निर्देशानुसार २० मे रोजी ही शपथ घेण्यात आली. आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा तसंच सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभिर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की , आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू आणि वर्धिष्णू करू, तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तीचा प्रतिकार करू अशा पद्धतीने शपथीचे वाचन करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading