जामीन मंजूर होऊनही पैशाअभावी तुरूंगाच्या बाहेर पडू न शकलेल्या ३३७ कैद्यांची सुटका

जामीन मंजूर होऊनही पैशाअभावी तुरूंगाच्या बाहेर पडू न शकलेल्या ३३७ कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या अनेक कैद्यांना जामीन मंजूर होऊनही पैशाअभावी तुरूंगाबाहेर येता येत नाही. अशा कैद्यांची बंदी पुनर्विलोकन समिती अंतर्गत सुटका करण्यात आल्याची माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत १६ जुलैला या अभियानाची घोषणा करण्यात आली होती. यासाठी असलेल्या निकषांमध्ये पात्र ठरलेल्या ठाण्यातील २६७ तर कल्याणमधील ७० कैद्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading