जव्हार येथील काळमांडवी धबधब्याच्या डोहात बुडून 5 मुले मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. ही सर्व मुलं जव्हार येथील रहिवासी होती. आज संध्याकाळी धबधब्यावर गेले असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये देवेंद्र वाघ, प्रथमेश चव्हाण, देवेंद्र फलटणकर, निमेश पाटील आणि रिंकु भोईर या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.