ठाणे महापालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने अखेर आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. संपूर्ण राज्यभर हे प्रकरण तापले असताना या अहवालात मात्र कोणावरही ठपका ठेवण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवशी मृत्यूचे तांडव होऊन एकावरही दोषारोप ठेवण्यात आला नसल्याने चौकशी समितीच्या चौकशीवरच आश्चर्य आता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी एसआयटी नेमावी अशी मागणी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. ठाण्याची आरोग्य व्यवस्था ही अतिशय ढासळलेली आहे, कंत्राट काढून करोड रुपये लाटले जातात, रुग्णांची प्रचंड हेळसांड पाहायला मिळते, कोविड काळात येथील आरोग्य व्यवस्था सर्वांनी पाहिलेली आहे, या रुग्णालयात न परवडणारा सामान्य माणूस सुद्धा जाणार नाही, हे प्रकरण पुन्हा तेच अधोरेखित करतय, यापुढे कोणाकडून अपेक्षा करायची हाच मोठा प्रश्न आहे, या संपूर्ण प्रकरणाचे एसआयटी नेमावी अशी मागणी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते रोहित जोशी यांनी केली आहे
You must be logged in to post a comment.