घाईघाईनं निर्णय घेतले जाणार नसल्याचं सांगत निर्बंध शिथील न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

कोणतीही गोष्ट घाईघाईनं केली जाणार नाही. जोवर खात्री पटत नाही तोवर काही निर्बंध शिथील केले जाणार नाहीत असे संकेत मुख्यमंत्र्यांनी काल ठाण्यात बोलताना दिले. काही ठिकाणी कोरोनाचे रूग्ण कमी होत असले तरी गाफील राहता येणार नाही. कोणीही गाफील राहू नये कारण गाफील राहिल्यानंतर दुसरी लाट उद्भवली असा जागतिक अनुभव आहे. आपण जागृत राहिलं तर ही लाट टाळता येईल. काही राज्यांनी काही गोष्टी घाई गडबडीने केल्या असल्या तरी आपल्याकडे तसं होणार नाही. जोवर पूर्ण खात्री पटत नाही तोवर निर्बंध शिथील करता येणार नाहीत असे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिले. अनेक गोष्टींना यापूर्वीच परवानगी देण्यात आली आहे मात्र उर्वरीत काही गोष्टी लगेचच सुरू करता येणार नाहीत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी काही निर्बंध आणखी काळ कायम ठेवण्याचे संकेत यावेळी बोलताना दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading