कल्याण रेल्वे कोर्ट येथे झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत २ हजार २४४ प्रकरणं निकाली काढण्यात आली. कल्याण रेल्वे कोर्ट येथे न्यायाधीश स्वयम चोपडा यांच्या अधिकारात लोक अदालत आयोजित करण्यात आली होती . एकूण 2300 प्रकरणे न्यायालयात ठेवण्यात आली होती. त्यात 2 हजार 244 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. एकूण 43 चोरीच्या प्रकरणात तडजोड करण्यात आली तर 2 हजार 201 प्रकरणात आरोपीनी गुन्हा कबूल केला. गुन्हा कबूल करण्या प्रकरणात रेल्वे तिकीटची दलाली करणे, ट्रेन मध्ये फेरीवाले, चेन खेचणे, रेल्वे रुळ ओलांडणे, अपंग किंवा मालडब्यात प्रवास करणारी प्रकरणे आहेत. या प्रकरणातून एकूण 8 लाख 79 हजारांचा दंड सरकारला जमा करण्याचे आदेश देण्यात आले तर साडेदहा लाखांची रेल्वेला नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.