सध्या मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक, डिजीटल अशा विविध प्रकारची माध्यमे संक्रमणावस्थेतून जात असून त्यांनी तत्व आणि ध्येय न बदलता जनतेपर्यंत सत्य पोहचवावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दैनिक लोकमतच्या ठाणे येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. माध्यमांचं स्वरूप बदलत आहे. डिजीटल माध्यमातून मजकूर मोठ्या प्रमाणावर येत असून या सर्व बदलांमुळे माध्यमांचे वेगळे जग निर्माण झाले आहे. संक्रणावस्थेतून जाणाऱ्या विविध माध्यमांपुढे तत्व आणि ध्येय टिकवितानाच समाजाच्या विचाराला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.