उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या. पूर्व प्राथमिक शाळांपासून माध्यमिक शाळांपर्यंत शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचं शिक्षकांनी स्वागत केलं. विद्यार्थी वर्गही ब-याच दिवसांनंतर शाळेत यायला मिळाल्यामुळे आनंदात होता. विविध शाळांनी आपापल्या पध्दतीनं मुलांचं स्वागत केलं. ठाण्यातील सेकंडरी स्कूलमध्ये आजूबाजूच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना बोलावून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. या ज्येष्ठ नागरिकांनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. तर सरस्वती सेकंडरी मध्ये मुलांचं औक्षण करून तसंच मुलांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. शाळेत यायला मिळाल्यामुळे मुलंही खुशीत असल्याचं दिसत होतं. बहुतांश शाळांमध्ये थोड्याफार फरकाने हाच प्रकार पहायला मिळाला.