आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा सर्वत्र भक्तीभावानं साजरी झाली. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळपासुनच श्रीसाईबाबा, गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी समर्थ अशा विविध मंदिरांमध्ये भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी पादुका पुजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. फुलांच्या दुकानासमोर विद्यार्थ्यांची फुलं खरेदी करण्यासाठी गर्दी झाल्याचं चित्र दिसत होतं. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एकीकडे भक्तीभाव प्रकट होत असतानाच दुसरीकडे या दिवसाचा फायदा करुन घेण्याचा कल दिसत होता. फुलांचे विशेषत: गुलाबाचे तसेच हारांचे भाव गगनाला भिडले होते.