महापालिकेतर्फे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधवांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवीचे स्मरण करून आणि मानाच्या नारळाची पूजा करून वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर कळवा खाडी येथे मानाचा नारळ कोळी बांधवांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, माजी उपमहापौर पल्लवी कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कोळी बांधव उपस्थित होते.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading