अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू राहणार

राज्य शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली असली तरी नागरिकांचा रस्त्यावरील वावर कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारने हे नवीन आदेश जारी केले आहेत. यामध्ये किराणा दुकानं, भाजीपाला, फळं, डेअरी, बेकरी तसंच सर्व प्रकारची खाद्य पदार्थांची दुकानं, मटण, चिकन शॉप तसंच शेतीविषयक साहित्याची दुकानं, पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकानं ही सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहतील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading