अत्यावश्यक आणि जीवनाश्यक सेवेतील सर्व कर्मचारी, मालवाहतुकदार यांनी मास्क वापरणे आवश्यक -जिल्हाधिकारी

नागरिकांनी अत्यावश्यक आणि जीवनाश्यक सेवेतील सर्व कर्मचारी, मालवाहतुकदार यांनी मास्क वापरणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोविड-१९ विषाणूचा संसर्ग आणि प्रादूभाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना फिरताना आवश्यक ती काळजी घ्यावी. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रस्ते, हॉस्पीटल, ऑफिस, बाजार या ठिकाणी फिरत असताना चेहऱ्यावर त्रिस्तरीय मास्क लावणे अनिवार्य राहील. तसंच कोणत्याही व्यक्तीला वाहनातून फिरतानाही मास्क लावणं अनिवार्य राहिल. कोणत्याही व्यक्तीने, अधिकाऱ्याने कार्यालयात, कामाच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणी तसेच बैठकीमध्ये उपस्थित राहतांना चेह-यावर मास्क लावणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
मास्क हे प्रमाणित दर्जाचे औषधालयातून विकत घेतलेले किंवा घरी तयार केलेले धुण्या योग्य आणि धुतल्यानंतर निर्जंतुकीकरण करुन वापरु शकतील असे असावे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास किंवा विरोध दर्शविल्यास संबंधित व्यक्ती दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहील असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading