ऐन सणासुदीच्या दिवसात महागाईच्या भस्मासुरानं अति विराट रूप धारण केलं असताना सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणं कठीण होऊन बसलं आहे. अशा महागाईत सामान्य नागरिकांच्यासमोर दिवाळी सण साजरा कसा करायचा असा प्रश्न उभा ठाकला आहे. भारतीय विद्यार्थी सेना आणि शिवसेना शाखा बाळकूम तसंच जनहित फौंडेशनच्या संयुक्त विद्यमानं सर्वसामान्यांना दिवाळी सुसह्य व्हावी आणि जीवनावश्यक वस्तू अल्पदरात मिळाव्यात यासाठी बाळकूम येथे अल्पदरात साखर, तेल, साबण आणि सुगंधी उटणी वाटपाचा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. एका शिधापत्रिका धारकास १ किलो साखर, १ किलो तेल, १ साबण आणि १ उटणं पाकीट देऊन वाढत्या महागाईला चोख उत्तर देण्यात आलं. या उपक्रमाचा लाभ १२०० शिधापत्रिका धारकांनी घेतला.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/11/diwali-1-1.jpg)