ठाणे महानगरपालिकेला होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवहिनीचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे . महापालिकला होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या मुख्यवाहिनीमध्ये बिघाड झाला असून आज मध्यरात्री पर्यत दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे .
यामुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/10/tmc1.jpg)