दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. नरक चतुर्दशीला चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत शास्त्राप्रमाणे अभ्यंगस्नान केलं जातं. उद्या चंद्रोदय पहाटे ५ वाजून १२ मिनिटांनी तर सूर्योदय ६ वाजून ४२ मिनिटांनी होणार असल्यामुळं यावेळेत अभ्यंगस्नान करावं असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. शरिराला तेल, उटणे, अत्तर लावुन मसाज करुन गरम पाण्याने स्नान करण्याला अभ्यंग स्नान म्हणतात. अभ्यंग स्नान केल्यानं स्नायु बळकट होतात, त्वचा तेजस्वी होते असं सोमण यांनी सांगितलं. दिवाळीच्या उत्सवात वायू आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी असंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/11/narakchaturdashi.jpg)