जिल्हा शासकीय रूग्णालयात पुढील आठवडाभर तरी शव विच्छेदनासाठी बंद राहणार आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयातील शव विच्छेदन विभागातील वातानुकुलित यंत्रणा गेले काही दिवस योग्यत-हेनं चालत नसल्यामुळं अनेक मृतदेहांची परवड होत होती. शवविच्छेदन विभागात जवळपास २५ हून अधिक मृतदेह पडून होते. या मृतदेहांवर कोणीच दावा न केल्यामुळे त्यांची दुर्दशाही झाली होती. शव विच्छेदन विभागातील कर्मचारीही वातानुकुलित यंत्रणा चालत नसल्यामुळं रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करत होते. पोलीसांनी शवागरातील हे २५ हून अधिक मृतदेह त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हलवल्यानंतर कालपासून शवागरातील वातानुकुलित यंत्रणेच्या दुरूस्तीच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. हे काम आठवडाभर चालण्याची शक्यता असल्यामुळं या दरम्यान शव विच्छेदनासाठी कोणतेही मृतदेह स्वीकारले जाणार नाहीत.