गरीब परिस्थिती हा शिक्षणातील अडथळा न ठरता तो शिक्षणाच्या उन्नतीचा मार्ग ठरायला हवा – प्रकाश पाटील

समाजाच्या शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची आवश्यकता असून सामाजिक बांधिलकी जोपासत विज्ञानाची कास धरायला हवी, गरीब परिस्थिती हा शिक्षणातील अडथळा न ठरता तो शिक्षणाच्या उन्नतीचा मार्ग ठरायला हवा यासाठी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा असा कानमंत्र राज्य हातमाग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं ४५वं जिल्हास्तरीय प्रदर्शन कौसा येथे आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रकाश पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलताना त्यांनी हा कानमंत्र दिला. या प्रदर्शनात सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, महापालिका क्षेत्रातील सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून ६० प्रकल्प या प्रदर्शनात सादर करण्यात आले आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षकांसाठी तसंच प्रयोगशाळा सहाय्यकांची नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ३० प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. उद्यापर्यंत या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. या स्पर्धेतून निवडण्यात येणारे प्रकल्प राज्य स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading