पर्यावरण प्रेमीवर उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्याची नामुष्की

ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीनं मंजुरी दिलेल्या प्रकरणांवर मुंबई उच्च न्यायालयात रोहित जोशी या पर्यावरण प्रेमी नागरिकानं दाखल केलेली याचिका त्यांना मागे घ्यावी लागली आहे.

ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीनं २२ मेला मंजुरी दिलेली प्रकरणं आणि वृक्षअधिका-यांच्या नियुक्तीसंदर्भात रोहित जोशी यांनी मुंबई
उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर वेळोवेळी सुनावण्या झाल्या होत्या. न्यायालयानं वृक्षतोडीच्या प्रकरणांमध्ये स्थगिती दिली होती. या याचिकेची अंतिम सुनावणी मुख्य न्यायाधिश जोग आणि डांगरे यांच्या खंडपीठासमोर झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयानं याचिकेतील वेगवेगळ्या प्रार्थना आणि तपशीलाबाबत आढळलेल्या त्रुटी आणि याचिकाकर्त्यांचा हेतू याबद्दल न्यायालयानं प्रश्नांचा भडीमार केला आणि त्यास खडे बोल सुनावले. न्यायालयानं याचिका कर्त्याच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित केल्यानं याचिकाकर्ते रोहित जोशी यांना आपली याचिका मागे घ्यावी लागली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading