ठाणे आणि पालघर जिल्यातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार न्यायालये, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये १० एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीत दिवाणी स्वरूपाची, फौजदारी स्वरूपाची, तडजोडीस पात्र, वैवाहिक स्वरूपाची, १३८ एन. आय.अॅक्ट (चेक संबंधिची) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटर अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगार विषयक वाद , भूसंपादन प्रकरणे , वीज आणि पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तरी सर्व पक्षकारांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयाला अर्ज करावा. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा . तसेच राष्ट्रीय लोकअदालतीबाबत कोणतीही समस्या असेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा.