लम्पी आजारामुळे मृत्यू पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना मिळणार नुकसान भरपाई

लम्पी आजारामुळे मृत्यू पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार आहे. लम्पी त्वचारोगाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविल्यामुळे लम्पी त्वचा रोगनियंत्रणात आहे. या रोगाने बाधित पशुधनावरील उपचाराचा सर्व खर्च राज्य शासनामार्फत मोफत करण्यात येत असून लसीकरण, उपचार आणि शवविच्छेदन या सेवा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत दिल्या जात आहेत. जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यास १ कोटी निधी तातडीने उपलब्ध करण्यात आला आहे. या रोगामुळे मृत जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी समीर तोडणकर यांनी दिली आहे. यामध्ये दुधाळ जनावरांसाठी ३० हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरासाठी २५ हजार आणि मृत वासरासाठी १६ हजार रुपये भरपाई मिळणार असल्याचं त्यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यात एकूण २७ केंद्रबिंदू आहेत. एकूण १०४ जनावरे बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण ४ जनावरे या रोगाने मृत झाली आहेत. जिल्ह्यात एकूण ८०५३२ इतके गो-वर्गीय पशुधन असून त्यापैकी आतापर्यंत १६ हजार ९६५ जनावरांचे लसीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. लम्पी त्वचा रोगाचा प्रसार आणि हानी पाहता राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे लम्पी त्वचारोग नियंत्रणात आणण्यास पशुसंवर्धन विभागास यश येत आहे. लम्पी त्वचा रोगाचा प्रसार रोखण्याकरिता सर्वत्र लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व जनावरांचे लसीकरण ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती तोडणकर यांनी दिली आहे. पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यात शिघ्रकृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर औषधांची ड्रग्स बँक देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी जाहीर केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading