रस्त्यावर राहणा-या एका गरीब व्यक्तीला ठाण्यातील काही सहृदय व्यक्तींमुळे जीवदान मिळालं आहे. राजू खान ह्या रस्त्यावर राहणा-या व्यक्तीला गंभीर जखमा झाल्या होत्या. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला रस्त्यावरून उचलून वेदांत रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. डॉ. रहेश रवींद्रन, डॉ. उदयभान मौर्य, कॅसबर ऑगस्टीन यांच्या सौजन्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. एका आठवड्याच्या उपचारानंतर राजू खान यांच्या ८० टक्के जखमा ब-या झाल्या. दुर्गंधीयुक्त जखमांमुळे तो घर सोडून रस्त्यावर राहत होता. या व्यक्तींनी त्याच्या भावाचा नंबर मिळवून त्याच्यावरील उपचाराची माहिती दिली. त्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या घरी सोडण्यात आलं. समाजातील काही सहृदय व्यक्तींमुळे आज राजू खानला पुन्हा त्याचं जीवन पुन्हा मिळालं.