मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला मंत्री पदाचा शब्द दिला होता ते शब्द पाळतील – प्रताप सरनाईक

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला मंत्री पदाचा शब्द दिला होता ते शब्द पाळतील असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत, ते रस्त्यावर उतरून नाल्यात उतरून काम करत आहेत. लवकरच मंत्री मंडळ विस्तार होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आपण कोलंबोला गेलो तेव्हा रामसेतूचे दगड पाहिले. रामसेतूचे अवशेष पाहिले. राम मंदिराच्या निर्माणानंतर आता रामसेतू निर्माण व्हावे अशी मागणी केल्याचं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं. श्रीलंकेतील संस्कृती आपल्यासारखी असून त्या ठिकाणचे लोक दाक्षिणात्य भाषा बोलतात. रामसेतू बांधण्यात आल्यास दोन्ही देश जवळ येऊन आपापसातील संबंध सुधारतील असं मत प्रताप सरनाईक यांनी बोलताना व्यक्त केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading