महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोनाच्या संकटाविरोधात शासन, प्रशासन, संपूर्ण जनता आज एकजुटीनं लढत आहे, हे चित्र आश्वस्त करणारे आहे. आपण लवकरच कोरोनाला हरविणार आहोत. तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतली आहे. घरी रहा, सुरक्षित रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन शिंदे यांनी आपल्या संदेशाच्या माध्यमातून जिल्हावासियांना केलं आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शासनाचे नियम पाळून अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम करण्यात आला.