दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधी दरम्यान परिवहन सेवेच्या बसमध्ये ५० टक्क्यांची सवलत

ठाणे महापालिका क्षेत्रातील दहावी-बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधी दरम्यान परिवहन सेवेच्या बसमध्ये ५० टक्क्यांची सवलत मिळणार आहे. महापालिका आयुक्तांनी हा सवलतीचा निर्णय घेतला आहे. आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाली असून १ मार्च पासून शालांत परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र पाहून विद्यार्थ्यांना ही ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याचबरोबर परीक्षा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढच्या दाराने प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन सेवेनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading